PM Kisan Yojana: या दिवशी येणार आहे पीएम किसान योजनेचा हप्ता, येथे जाणून घ्या वेळ आणि तारीख

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही खूप दिवसापासून आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतातील काही कामासाठी मदत होईल. सध्याच्या परिस्थितीमध्ये देशातले 13 कोटी पेक्षा जास्त शेतकरी बांधव या योजनांचा लाभ घेत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना खूप आर्थिक मदत मिळत आहे.

आता सध्या शेतकरी मित्र योजनेच्या 20 व्या हप्त्याची वाट पाहत आहे. अधिकृत माहितीनुसार तुम्हाला सांगायचे तर लवकरात लवकर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे. या व्यतिरिक्त या स्कीमची सर्वात चांगली गोष्ट हीच आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होतात. यामुळे कोणताही मध्यस्थ माणूस हस्तक्षेप करू शकत नाही. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 21 हप्ते यशस्वीपणे देण्यात आलेले आहे.

कधी मिळणार या योजनेचा 20वा हप्ता

लवकरात लवकर पेरणीला सुरुवात होणार आहे व पेरणीसाठी लागणारे खत आणि बी यासाठी पैसे लागतात. यामुळे सध्या करोडो शेतकरी 20व्या हप्त्याची वाट पाहत आहे. की कधी पैसे येतील आणि मी सर्व सामान विकत घेईन. तसं पाहिलं तर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये भेटतात आणि हे 6 हजार रुपये 3 टप्प्यांमध्ये वाटले जातात.

प्रत्येक टप्प्यामध्ये 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना दिला जातो. शेवटचा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जमा झाला होता. याचबरोबर अठराव्या हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये जमा केला गेला होता आणि याच हिशोबावरून अंदाजा लावला जात आहे की 20वा हप्ता जून 2025 किंवा जुलै 2025 या महिन्यात जमा होऊ शकतो. सध्या सरकारकडून 20व्या हप्त्यांची कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नाही.

काय आहे या योजनेचे नवीन नियम

अधिकृत माहितीनुसार सांगायचे तर केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री किसान योजना मध्ये पुष्कळ महत्त्वाचे बदल केलेले आहे आणि नवीन नियम लागू केलेले आहे.‌ आता एका कुटुंबातील एका पेक्षा जास्त व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. पहिले असं होतं की एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना लाभ घेता येत होता पण आता घेता येणार नाही. नवीन नियमांच्या अनुसार पती-पत्नी नाहीतर मुलगा मुलगी यापैकी फक्त एका जणांना लाभ घेता येणार आहे.

शेतकऱ्यांचं महत्व

शेतकऱ्यांचे जीवन खूप कठीण असते कारण शेतकऱ्यांचे जीवन हे पूर्णपणे हवामानावरच अवलंबून असते.‌ या म्हणण्याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही पेरणी केली आणि पाऊस आलाच नाही तर अशावेळी शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं. याशिवाय जास्त पाऊस पडल्यानंतर पूर येऊ शकतो आणि चांगले पीक वाहून जाऊ शकतं नाहीतर पाऊस जास्त पडल्यानंतर पीक चांगलं येत नाही आणि बाजारात चांगला भाव मिळत नाही. सरकारनं हे सर्व लक्षात घेतलं आणि या योजनेची साल 2019 मध्ये त्वरित सुरुवात केली.

अशी तपासा योजनेची लाभार्थी यादी

प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं नाव या योजनेत आहे की नाही हे तपासणं खूप गरजेचे आहे. कारण जर तुमचं नाव लिस्ट मध्ये नसेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही. यासाठी तुम्हाला योजनेची सूची तपासणी आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे.

नंतर तुम्हाला होम पेजवर फार्मर्स कॉर्नर या सेक्शन मध्ये बेनिफिशियरी लिस्ट नाव दिसेल त्या पर्यावरावर क्लिक करा. आता तुम्हाला राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. आता खाली दिलेल्या गेट रिपोर्ट बटणावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला गावातील संपूर्ण लाभार्थ्यांची यादी दिसून येईल आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव सुद्धा पाहू शकता.

आता शेतकऱ्यांना 6000 रुपया ऐवजी मिळणार 9000 रुपये, पहा संपूर्ण माहिती इथे

Leave a Comment