Tractor Subsidy Yojana: महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या जनतेसाठी बऱ्याच योजना काढलेल्या आहे. यामध्येच सरकारने विशेषता राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील कृषी क्षेत्रात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने खूप महत्त्वाची योजना काढलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना म्हणजेच शेतकरी गटांना आपल्या शेतीसाठी खूप आवश्यक असलेले छोटे ट्रॅक्टर आणि त्यासोबत जेवढे उपसाधने लागतात.
त्यावर अनुदान दिलं जाणार आहे. जर या योजनेचा उद्देश पाहिला तर गावांकडे जेवढे शेतकरी आहेत त्यांना आर्थिक बळ आणि त्यांच्या शेतातली मशागत सोपी करून देणे आहे. इतकंच नाही तर शेतकऱ्यांची कामांमध्ये गती वाढेल आणि जास्त उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता निर्माण होईल. लक्षात राहू द्या या योजनेचा लाभ राज्यातील शेतकरी समुदायाच घेऊ शकतो.
योजनेचे तपशील
या योजनेच्या माध्यमातून शेतकरी गटांना 9 ते 18 एचपी क्षमतेचा मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे. याचबरोबर कल्टीवेटर, रोटावेटर आणि ट्रेलर सारखी काही कृषी साधने विकत घेण्यासाठी 90% पर्यंत अनुदान मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सांगायचे तर पूर्ण खरेदी खर्चाची मर्यादा जवळपास तीन लाख 50 हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त सरकारच्या मार्फत तीन लाख पंधरा हजार रुपयांचा अनुदान दिलं जाणार आहे आणि राहिलेले जे 35 हजार रुपये आहे ते शेतकरी गटाने स्वतः भरावं लागणार आहे.
जाणून घ्या पात्रता
जर तुम्हाला या योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारच्या ज्या अटी आहे त्या तुम्हाला स्वीकाराव्या लागतील. सर्वप्रथम अर्जदार करणारा व्यक्ती स्वयंसहायता बचत गट महाराष्ट्र राज्यात नोंदवलेला खूप गरजेचं आहे. याचबरोबर गटाचे अध्यक्ष, सचिव कमीत कमी 80 टक्के सदस्य हे नवबौद्ध आणि अनुसूचित जाती समुदायातील असले पाहिजे.
या अटीमुळे हे होईल की खरंच गरजू लोकांना या योजनेचा लाभ सहजपणे मिळू शकेल. याशिवाय शेतकरी गटाने शेतीतील संबंधित कामांमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे. या अटी बद्दल बोलायचं तर ही अट यामुळे ठेवलेली आहे. कारण खरंच शेती क्षेत्रामध्ये जेवढे शेतकरी गट सक्रिय आहे त्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकेल.
आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवाकडे काही आवश्यक कागदपत्रे होणं खूप गरजेचं आहे. यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांकडे गटाची नोंदणी प्रमाणपत्र आणि प्रत्येक सदस्य जातीचे दाखले पाहिजे. याव्यतिरिक्त सर्व सदस्यांची संपूर्ण यादी व गटाच्या बँक खात्याची संपूर्ण तपशील पाहिजे.
याचबरोबर खरेदी करायच्या साधनांचा तपशील वर अंदाजे किती खर्च येईल हे सुद्धा सांगायचे आहे. लक्षात ठेवा जर तुम्हाला हे अर्ज मंजूर करायचे असेल तर या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे खूप महत्त्वाची आहे.
मुदत आणि अर्ज करण्याची प्रक्रिया
शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो की या योजनेसाठी तुम्ही फक्त 30 जून 2025 पर्यंत ही अर्ज सादर करू शकतात. म्हणून जेवढ्या इच्छुक स्वयंसहायता गटांना या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर लवकरात लवकर घ्यावा.
तुम्हाला वेळेच्या अगोदरच आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागतील. लक्षात राहू द्या अर्जाची प्रोसेस सुरळीत आणि पारदर्शक ठेवण्याकरिता सरकारने साप साप मार्गदर्शक तत्वे प्रकाशित केलेले आहेत.
संपर्क
तुम्हाला या योजनेचा फायदा घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. जर तुम्हाला याबद्दल जास्त माहिती पाहिजेत असेल तर तुम्ही नासरडी पुलाजवळ नाशिक क्लब समोर नाशिक पुणे रोडवर या पत्त्यावर जायचं आहे.
सरकारचा मोठा निर्णय, आता घरकुल योजनेत मिळणार 50 हजार रुपये जास्त, नवीन GR जाहीर