Crop Insurance Good News: महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी आलेली आहे. यापूर्वी ज्या-ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचं इन्शुरन्स काढलं होतं, त्याच शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पिक विमा या योजनेच्या माध्यमातून आता महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे जमा मिळणार आहे.
या योजनेमुळे आता शेतकऱ्यांना हजारों रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट झालेले आहे. आता त्या शेतकऱ्यांचा पिक विमा बँक खात्यामध्ये जमा होणे सुरू झालेला आहे. तर चला आपण पाहू याबद्दल सर्व माहिती विस्तारपणे.
डिजिटल व्यवस्थांच्या माध्यमातून होणार विमा वितरण
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्यांच्यानुसार सांगायचे तर यावर्षी जी विमा रक्कम वितरणाची प्रोसेस आहे ती पूर्णपणे डिजिटल करण्यात आलेली आहे. म्हणजेच जर शेतकऱ्यांना विमा रकमेची स्थिती तपासायची असेल तर आता ते ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून स्थिती तपासू शकतात.
इतकंच नाही तर या वेबसाईटवर शेतकरी रजिस्टर मोबाईल नंबर च्या माध्यमातून सहज प्रवेश करू शकतो आणि या प्रवेश प्रक्रिया बद्दल सांगायचे तर ही प्रक्रिया खूप सोपी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना फक्त मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ओटीपी येईल ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही सहजपणे ओपन करू शकतात.
विम्याच्या रकमेत झाली वाढ
मिळालेल्या माहितीनुसार सांगायचं तर यंदा विम्याच्या रकमेत वाढ करण्यात येणार आहे. आता खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 2,854 रुपये भेटणार आहे तर रब्बी हंगामासाठी 3,101 इतकी रक्कम देण्यात येणार आहे आणि ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या माध्यमातून जमा केली जाणार आहे. डीबीटी चा हाच फायदा असतो की मधात असलेले लोकं हे पैसे खाऊ शकत नाही.
कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, पुणे याच बरोबर काही कृषी जिल्हे यवतमाळ, अमरावती, अकोला आणि सोलापूर या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पिक विमा मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक परिस्थिती पाहून आणि पीक पद्धतींचा विचार करून शेतकऱ्यांना विमा देण्यात येणार आहे.
काय आहे या योजनेचे फायदे
प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना खूप प्रकारचे फायदे मिळत आहेत. जर समजा तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणतीही पीक लावले आणि त्या पिकाचं इन्शुरन्स म्हणजेच विमा काढला आणि पुढे जाऊन तुमचं पीक नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट होत असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळते.
यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण कमी होतो आणि याच बरोबर पीक कर्जाची परतफेड करणे खूप सोपं होते. याव्यतिरिक्त महाराष्ट्र कृषी विभागाचे सचिव श्री. विकास चंद्र रस्तोगी यांनी सांगितले आहे की येणाऱ्या काळात पिक विमा योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या जाईल. याचबरोबर विम्याच्या वितरणाची जी प्रक्रिया आहे ती यापेक्षा सोपी केली जाईल.
शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
शेतकऱ्यांना जर पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वप्रथम पिक विमा पोर्टल मधील नियमितपणे माहिती तपासावी. याचबरोबर शेतकऱ्यांचे बँक खाते डीबीटी लिंक असणं खूप गरजेचं आहे. याव्यतिरिक्त आवश्यक कागदपत्रे तुम्हाला ठेवावीत लागेल. पेरणी हंगाम अनुसार तुम्हाला पिक विमा वेळेत भरावा लागेल.
सरकारचं शेतकऱ्याला जबरदस्त गिफ्ट, ट्रॅक्टर घेण्यासाठी मिळणार 3 लाख रुपये, जाणून घ्या पात्रता