Free Tablet Yojana: ज्या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड ची परीक्षा पास केलेली आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे. चांगली बातमी हीच आहे की आता मागासवर्गीय भटक्या जाती आणि विमुक्त जमाती व तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून मोफत टॅबलेट मिळणार आहे.
नुकतेच दहावी बोर्ड परीक्षा का निकाल आधिकारिक वेबसाइट वर जाहीर केलेला आहे आणि हे विद्यार्थी आता अकरावीच्या ऍडमिशन साठी प्रयत्न करत आहे. सध्या महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना काढली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांना फुकट मध्ये टॅबलेट देण्यात येणार आहे. जर तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या आर्टिकल ला पूर्णपणे वाचा.
काय आहे फ्री टॅबलेट योजना?
महाराष्ट्र राज्य सरकारने विशेषता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक योजना सुरू केलेली आहे आणि त्याचं नाव महा ज्योती योजना ही योजना त्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे ज्यांना दहावी बोर्ड परीक्षेत खूप चांगले मार्क्स पडलेले आहे.
जर या योजनेचं उद्देश पाहिलं तर योजनेचा हेच उद्देश आहे की तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सुधार करणे आहे. इतकंच नाही तर सरकारच्या माध्यमातून मोफत मध्ये इंटरनेट सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे.
या योजनेची काय आहे लाभ?
मिळालेल्या माहितीनुसार सांगायचे तर महाराष्ट्र मुख्यमंत्री महाज्योती योजनेच्या (Mahajyoti Yojana) अंतर्गत दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना खूपसार्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्यामध्ये सर्वात पहिले पात्र विद्यार्थ्यांना टॅबलेट सोबत मोफत इंटरनेट कनेक्शन दिल्या जाणार आहे.
याशिवाय JEE, NEET आणि MHT-CET अशा या स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन मिळणार आहे आणि सोबतच प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे. ही जी ट्रेनिंग आहे ही त्याच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे जे बारावी सायन्स ब्रांच मधील जे विद्यार्थी इंजिनियरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रातील करिअर बनवायचं इच्छितात.
पात्रता
या योजनाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही अटी निर्धारित केलेले आहेत आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना पूर्ण कराव्या लागणार आहे. यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ निवासी होणं खूप आवश्यक आहे आणि याच बरोबर विद्यार्थी मागासवर्गीय, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील आणि विमुक्त जातीतील असणे खूप महत्त्वाचं आहे. लक्ष राहू द्या या योजनेचा लाभ त्याच विद्यार्थ्यांना मिळणार आहे जे 2024-25 शैक्षणिक वर्षा मधील पास झालेले आहे.
म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी अकरावी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा आणि हो या योजनेची निवड प्रक्रिया दहावीच्या टक्केवारीच्या अनुसार केली जाणार आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना दहावी बोर्ड मध्ये सर्वात जास्त टक्के मिळेल त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. अधिकृत माहितीनुसार शहरी भागातील जे विद्यार्थी आहे त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी 70 टक्के गुण असणे खूप महत्त्वाचे आहे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे खूप महत्त्वाची काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल आणि दहावीची मार्कशीट पाहिजे. याचबरोबर अकरावी वर्गातील विज्ञान शाखेत जो तुम्ही प्रवेश घेतला आहे त्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट आणि प्रवेशाची पावती सुद्धा तुम्हाला लागणार आहे. जर त्यामधील कोणता विद्यार्थी दिव्यांग किंवा अनाथ असेल तर यासाठी तुम्हाला वेद प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा?
फ्री मध्ये टॅबलेट पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम https://www.mahajyoti.in या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे. नंतर तुम्हाला होम पेजवर फॉर्म ची लिंक दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे आणि फॉर्ममध्ये जेवढी माहिती तुम्हाला विचारली असेल तेवढी माहिती भरायची आहे. आता वरील दिलेल्या आवश्यक कागदपत्रांना अपलोड करायची आहे आणि खाली दिलेल्या सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.