Mansoon Update: यावर्षी पावसाने नवीनच खेळ मांडलेला आहे. म्हणजे ज्या महिन्यात पाऊस पडायला पाहिजे त्या महिन्यात उकाड्याची लाट पडत आहे आणि ज्या महिन्यात उकाड्याची लाट पडायला पाहिजे होती त्या महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली. या अगोदर पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगायचे तर यांनी पाऊस कधी पडेल याची तारीख सांगितली होती. पण अद्याप पाऊस आलेला नाही.
आता हवामान विभागाकडून पुन्हा एक वाईट बातमी आलेली आहे. ती म्हणजे ही आहे की पाऊस लवकर नाही पडणार. याव्यतिरिक्त विदर्भात उकाड्याची लाट पडणार. आता सध्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये मान्सूनला कधी सुरुवात होणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगायचे तर गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मान्सून पोहोचला आहे. जर तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल, तर हा लेख पूर्ण वाचा.
तापमानात झाली वाढ
सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतो की ऊन जरा जास्तच तपत आहे व त्याचबरोबर गरम वाऱ्यामुळे बऱ्याच जणांना खूप त्रास होत आहे आणि उत्तरेकडील गरम वाऱ्यामुळे तापमानात दिवसा न दिवस वाढ होत चाललेली आहे. याव्यतिरिक्त सूत्रांच्या माहितीनुसार सांगायचे तर 12 जून नंतर विदर्भात पावसाचे वातावरण तयार होणार आहे आणि हा पाऊस साधारणपणे पडणार आहे.
हा पाऊस साधारण असला तरी पण वादळी वारे 40 ते 50 किलोमीटर प्रति तासानं धावणार आहे. तसं जर पाहिलं तर दरवर्षी पावसाळ्याची सुरुवात दहा ते पंधरा जूनला होते. परंतु यावर्षी पावसाळा लवकरच महाराष्ट्र मध्ये दाखल झालेला आहे. अनुकूल परिस्थिती निर्माण न झाल्यामुळे यावेळेस पाऊस जरा रखडलेला गेलेला आहे. समुद्रातून पावसाला पूरक वातावरण निर्माण होत नाही. यामुळे उत्तरेकडून गरम वारे वाहत आहे आणि यामुळेच तापमानात खूप वाढ झालेली आहे.
विदर्भात पावसाळ्याचे आगमन लांबले गेले
मित्रांनो यावर्षी विदर्भात पावसाळ्याचे जे आगमन लवकर होतं ते लांबलेलं गेलेलं आहे. यामुळे विदर्भाच्या लोकांना गर्मीचा आणखी काही दिवस सामना करावा लागणार आहे. जर आपण भारतीय हवामान खात्याच्या दृष्टीने पाहिलं तर विदर्भात मान्सून ची वाट 12 जून पर्यंत पहावी लागणार आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात मान्सून दाखल झालेला होता परंतु अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे पाऊस रखडला गेलेला आहे.
सध्या जर पाहिलं तर विदर्भाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये 43 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 12 जून 2025 पर्यंत तापमानात कायम वाढ राहणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान खात्याद्वारे वर्तवण्यात आलेला आहे. गोंदिया जिल्ह्यात 7 जून 2025 रोजी किमान 38 अंश सेल्सिअस तापमान होतं. परंतु आता ते वाढून 42.1 अंश सेल्सिअस झालं. या तापमानामुळे बऱ्याच लोकांना त्रास होत आहे.
सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी, तटरक्षक दलात 630 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा