Namo Shetkari Yojana: आता शेतकऱ्यांना 6000 रुपया ऐवजी मिळणार 9000 रुपये, पहा संपूर्ण माहिती इथे

Namo Shetkari Yojana: महाराष्ट्र राज्य सरकार द्वारा चालवण्यात येणारी नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते व तसेच केंद्रीय सरकारच्या माध्यमातून चालवणारी प्रधानमंत्री किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) द्वारा सुद्धा शेतकऱ्यांना दरवर्षाला 6 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. म्हणजे या हिशोबाने पाहिलं तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला या दोन योजनांतून दरवर्षी 12 हजार रुपयाची आर्थिक मदत मिळते.

नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा 3 टप्प्यांमध्ये दिले जाते. चार महिने मिळून दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना मिळतो. महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. बातमी अशी आहे की आता महाराष्ट्र नमो शेतकरी योजनेच्या (Maharashtra Namo Shetkari Yojana) माध्यमातून शेतकऱ्यांना 6000 रुपयाच्या ऐवजी आता 9000 हजार रुपये मिळणार आहे.

योजनेच्या आर्थिक मदतीमध्ये होणार वाढ

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी एका मीटिंगमध्ये खूप महत्त्वाची घोषणा केली होती आणि त्या घोषणांमध्ये त्यांनी सांगितलं होतं. आता नमो शेतकरी योजनेचे लाभार्थ्यांना यापुढे सहा हजार रुपये ऐवजी आता नऊ हजार रुपये देण्यात येणार आहे आणि या निर्णयामुळे राज्यातील सर्व शेतकरी खूप आनंदी झालेले आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीस ने सांगितले की 2025 चा खरीप हंगाम सुरू होण्याअगोदर पुढचा हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल.

शेतकरी ओळखपत्र आणि ॲग्रीस्टॉक योजना

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या पारदर्शकपणे साठी पात्र लाभार्थ्यांना योग्य आर्थिक मदत पोहोचण्याकरिता ॲग्रीस्टॉक योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र अनिवार्य आहे. याचा निर्णय सरकार द्वारा घेण्यात आलेला आहे. तुमच्या माहितीसाठी हे जे ओळखपत्र आहे हे अगोदरच प्रधानमंत्री किसान योजनेसाठी अनिवार्य केलेले गेले आहे.

परंतु नमो शेतकरी योजनेसाठी आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती प्रकाशित करण्यात आलेली नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांना एक सल्ला दिलेला आहे की लवकरात लवकर तुम्ही फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे. कारण तुम्हाला भविष्यामध्ये या ओळखपत्राच्या माध्यमातून बरेच लाभ घेता येतील.

काय आहे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि चिंता

तुम्हाला सांगतो की राज्य मधले जेवढे शेतकरी बांधव आहेत ते सर्व या योजनेच्या येणाऱ्या आर्थिक मदतीवर अवलंबून आहेत. कारण पेरणीच्या वेळेस शेतकरी या पैशातून बी बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी खर्च करू सहजपणे खर्च करू शकतो. इतकंच नाही तर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना हा निधी खूपच महत्त्वाचा वाटतो.

परंतु या योजनेच्या मार्फत त्यांच्यामध्ये वाढ केल्यानंतर ही त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे सर्व शेतकरी खूप दुःखी झालेले आहेत. सर्व शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न फिरत आहे तो म्हणजे आता देवेंद्र फडणवीस ने जी घोषणा केली होती त्याचं काय होणार आहे आणि आम्हाला खरोखर पैसे वाढवून मिळणार आहे का नाही याची चिंता सध्या शेतकऱ्यांना होत आहे.

निधी वाटप

तसं जर पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारवर खूप योजनांचे आर्थिक भार आहेत. ज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना सारखे खूप मोठ्या योजनांचे भार आहेत. या सर्व कारणामुळे राज्य सरकारला प्राधान्यक्रम ठरवावे लागतात आणि योग्य निधीचा वाटप करावा लागतो.

या सर्वांमध्ये देवेंद्रजी फडणवीस ने सांगितलेले आहे की लवकरात लवकर नमो शेतकरी योजनाचा सातवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु याव्यतिरिक्त अजून 3000 कोटी रुपयांची कशी व्यवस्था करणार आहे हे अजून पर्यंत स्पष्ट केलेलं नाही. सध्या सरकारी अधिकारी या अडचणीवर कार्य करत आहे. एकदा ही अडचण दूर झाली की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केली जाईल. तसं जर पाहिलं तर शेतकरी नमो योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे.

सरकार देत आहे फॉर्म भरल्यानंतर थेट 80 हजार रुपये, इथे बघा अर्ज करण्याची पूर्ण प्रोसेस

Leave a Comment