RBI New Rules: भारतातच नाही तर जगातल्या कोणत्याही देशांमध्ये पाहिलं तर जास्तीत जास्त लोक आपले पैसे बचत खात्यामध्ये जमा करतात. कारण बँकेमध्ये पैसे जमा केल्याने आपले पैसे एकदम सुरक्षित राहतात. म्हणजेच आपल्या पैशाला कोणतीही प्रकारचा खतरा राहत नाही. म्हणण्याचा अर्थ हाच आहे की बचत खातं प्रत्येक माणसाच्या आर्थिक जीवनाचा एक भागच आहे. रोजच्या दिनचर्यामध्ये आपण काही न काही आर्थिक व्यवहार करतंच असतो आणि कामासाठी सेविंग खात्याचा उपयोग करतो.
पण काही असे अनेक लोकांना सेविंग खात्याबद्दल पूर्ण माहिती माहित नसते. रिझर्व बँक ऑफ इंडिया बँकेने वेळोवेळी नियमांमध्ये खूप बदल केलेले आहे आणि हे बदल सर्वसामान्य माणसांना माहीत झालेच पाहिजे. अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार सांगायची तर आज पासून बँक खात्यात तुम्हाला फक्त एवढीच निश्चित रक्कम ठेवावी लागणार आहे. तर चला आपण या विषयी सविस्तरपणे माहिती पाहू.
काय आहे सेविंग अकाउंट चे महत्व?
सर्वप्रथम पाहिलं तर बचत खात्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे मिळत असतात आणि सेविंग अकाउंट चे महत्व सांगायची तर आपले पैसे बँकेमध्ये एकदम सुरक्षित राहतात. याशिवाय सुट्टीचे दिवस सोडून कोणत्याही दिवशी आपण बँकेत जाऊन पैसे जमा करू शकतो आणि काढू शकतो.
इतकंच नाही तर बँक आपल्या जमा पैशावर 3.5 टक्क्याने व्याज सुद्धा देते. बँकेमुळे कोणीही पण मोबाईल ॲप्लिकेशन किंवा इंटरनेट बँकिंग द्वारे व्यवहार करू शकते. याचबरोबर तुम्हाला बँकेकडून डेबिट आणि क्रेडिट कार्डची सुविधा सुद्धा मिळते. तरीसुद्धा पैसे जमा करणे आणि काढणे याची सुद्धा काही नियम आरबीआयचे आहेत. जे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे.
वार्षिक रोख रक्कम डिपॉझिटच्या सीमा
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अनुसार सेविंग अकाउंट मध्ये रोख रक्कम डिपॉझिट करण्याचे काही नियम आणि मर्यादा आहे जे तुम्हाला सांगितल्या आहेत. जर कोणता व्यक्ती 31 मार्च ते 1 एप्रिल म्हणजे एका वर्षात जर 10 लाख रुपये पेक्षा जास्त पैसे बँक अकाउंट मध्ये जमा करत असेल, तर तुमचा व्यवहार उच्च मूल्याचे व्यवहार म्हणून वर्गीकृत केले जातात. इतकंच नाही तर जर तुमचा दरवर्षी लाखांचा व्यवहार होत असेल तर बँक इनकम टॅक्स विभागाला माहिती देते.
जर कोणता व्यक्ती 2 लाखांपेक्षा पैसे बँकेमध्ये एकाच दिवशी जमा करत असेल तर इनकम टॅक्सची कलम 269ST च्या अंतर्गत त्या व्यक्तीला दंड भरावा लागू शकतो. या व्यतिरिक्त जर तुम्ही एकाच दिवसात 50 हजार रुपये पेक्षा जास्त पैसे जमा करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड नंबर देणे आवश्यक आहे. जर पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला फॉर्म 60/61 भरणे अनिवार्य आहे.
पैसे काढण्याचे नियम
सगळ्यात पहिले आपण वार्षिक मर्यादांचे नियम पाहू. जर कोणता व्यक्ती एका आर्थिक वर्षामध्ये सेविंग अकाउंट मधून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे काढत असेल. तर त्यावर आरबीआयच्या नियमानुसार 2 टक्के टीडीएस कपात केली जाते. याव्यतिरिक्त जर तुम्ही आयटीआय फाईल दाखल केली नसेल आणि तुमची मर्यादा 20 लाख रुपये असेल.
म्हणजे 20 लाखापेक्षा जास्त रक्कम जर तुम्ही काढत असाल तर तेव्हा पण टीडीएस कपात केली जाते. जर तुम्ही एटीएम वापर करत असाल तर बघा, तुम्ही दर महिन्याला फक्त 3 एटीएम व्यवहार करू शकतात आणि त्यानंतर प्रत्येक व्यवहरासाठी बँक तुमच्याकडून शुल्क आकारते.
तुमच्या बँक अकाउंट मध्ये असले पाहिजे मिनिमम एवढे पैसे
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार बँकेच्या शाखेच्या स्थानानुसार बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स किती असलं पाहिजे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सर्वप्रथम जर तुमची बँकेची ग्रामीण शाखा आहे तर साधारणतः 1 हजार रुपये ते 2 हजार रुपयांपर्यंत कमीत कमी बँक बॅलन्स असलं पाहिजे.
याव्यतिरिक्त अर्धशहरी शाखांमध्ये तुमचं मिनिमम बॅलन्स 2 हजार रुपये ते 3 हजार रुपये असले पाहिजे. याचबरोबर शहरी शाखा बँक मध्ये 3 हजार ते 5 हजार रुपये पर्यंत मिनिमम बॅलन्स असणे आवश्यक आहे. महानगरीय शाखांमध्ये 5 हजार ते 10 हजार रुपये पर्यंत मिनिमम बॅलन्स असणार आवश्यक आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विम्याच्या रकमेत झाली वाढ, आता थेट खात्यात जमा होतोय पिक विमा