School and College New Rules: महाराष्ट्र राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच शाळा आणि कॉलेज साठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये विभिन्न प्रकारचे काही मोठे बदल होणार आहे आणि त्याचा नवीन GR सुद्धा प्रकाशित केलेला आहे. या जीआर च्या माध्यमातून आपल्याला कळून येईल की सरकारनं नेमके कोणकोणते नियम बदलले आणि कोणते नवीन नियम लागू केलेले आहेत. इतकंच नाही तर एक नियमावली सुद्धा तयार करण्यात आलेली आहे.
आणि हो हा निर्णय फक्त शिक्षण क्षेत्राची दिशा बदलण्यासाठी घेतलेला आहे. आता यापुढे सर्व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी काही धोरणे तयार केलेली आहे जे विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून उपयुक्त ठरणार आहे. थोडक्यात सांगायची तर या प्रकल्पाचा उद्देश हाच आहे की सुरक्षा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे. तर आज आपण या या आर्टिकल च्या माध्यमातून हे बघणार आहोत की सरकारने कोणकोणते नवीन नियम लागू केलेले आहेत.
एसएमएसच्या माध्यमातून पालकांना संपर्क
शाळेमध्ये असे बरेच विद्यार्थी असतात की मधली सुट्टी झाली की लगेच ते पळून जातात. परंतु आता तसं करता येणार नाही. म्हणजेच जर आता विद्यार्थी मधल्या सुट्टीतच पळून गेला तर लगेच या गोष्टीची माहिती पालकांना एसएमएस च्या माध्यमातून दिली जाणार आहे.
याशिवाय विद्यार्थी घरून शाळेमध्ये येण्यासाठी निघाला आणि शाळेमध्ये आलाच नाही तर याची सूचना सुद्धा पालकांना कळविण्यात येणार आहे. यामुळे शाळा आणि पालकांमधील खूप संवाद मजबूत होईल आणि मुलांची आणि मुलीची सुरक्षितता चांगली होईल.
हजेरी मध्ये होणार बदल
हा मित्रांनो, आता येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हजेरी मध्ये बदल होणार आहे. पहिल्या वेळेस फक्त सकाळीच हजेरी घ्यावी लागत होती. पण आता हा नियम पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे. म्हणजेच यापुढे सकाळी शाळा सुरू झाली की पहिली हजेरी घेण्यात येणार आहे.
त्यानंतर दुपारची सुट्टी झाल्यानंतर दुसरी हजेरी घेण्यात येणार आहे आणि शाळा सुटण्याच्या अर्ध्या तासाने हजेरी घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता पळून जाण्याचे मार्गच नाही. पण जर कोणी विद्यार्थी तरीपण पळून गेला तर लगेच विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस द्वारा कळविण्यात येणार आहे.
शाळांमध्ये बसविले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे
शाळा आणि कॉलेज हे आपण एकच मानतो. या अगोदर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे असे काही नियम होते पण ते खूप कमी शाळा आणि कॉलेजमध्ये लागू केलेले होते. पण आता सरकारच्या नवीन नियमानुसार प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक झालेले आहेत. म्हणजे आता सर्व विद्यार्थी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणी मध्ये राहणार आहे.
यामुळे सर्वात मोठा फायदा हाच आहे की विद्यार्थ्यांवर बरोबर लक्ष ठेवण्यात येईल. एवढेच नाही तर सीसीटीव्ही कॅमेरे कोठे बसवायचे त्याच्या जागा सुद्धा ठरविण्यात आलेल्या आहे. ज्या मधील सर्वप्रथम शाळेचे प्रवेशद्वार तेथे कॅमेरा बसवण्यात येणार आहे त्यानंतर शाळेच्या सर्व वर्ग खोल्यांच्या आत आणि बाहेर, मैदानावर आणि स्वच्छतागृहांच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे.
कर्मचारी निवडणे बाबत घेतली जाईल कठोर तपासणी
या अगोदर पैसे देऊन कोणी पण कर्मचारी ची नोकरी मिळवत होतं. पण आता असं होणार नाही कारण वर्तमान मध्ये शाळांमध्ये जे कर्मचारी काम करत आहे आता त्यांची पार्श्वभूमी तपासणी खूप कठोर करण्यात आलेली आहे. आता शिक्षक आणि महिला शिक्षक यांच्यासाठी पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र हे लागू केलेलं आहे.
ज्या व्यक्तींना शाळेमध्ये नोकरी करायची असेल तर त्यांच्याजवळ सुद्धा हे प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं असणार आहे आणि जर हे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला नोकरी मिळणं अशक्य होईल. याशिवाय कोणता कार्यरत कर्मचारी नियुक्त झाला आणि त्याच्याबद्दल गुन्हेगारी ची पार्श्वभूमी लक्षात आली तर त्यांना त्वरित नोकरी वरून काढले जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी काही नियम
सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर आता खूप स्पर्धा वाढत चाललेली आहे आणि याच बरोबर लोकसंख्या पण खूप वाढत चाललेली आहे. लोकसंख्या वाढल्याने कमी जागेसाठी जास्त विद्यार्थी हे कधी पण परीक्षेत भाग घेतात आणि यामुळे काही विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर मानसिक दुष्परिणाम होतो.
म्हणून सरकारच्या नवीन नियमानुसार या स्पर्धेच्या जगामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक मनावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होऊ नये. म्हणून आता सरकार खास विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर बारकाईने लक्ष देणार आहे. थोडक्यात सांगायचं तर मानसिक आरोग्य शैक्षणिक तणाव आणि सामाजिक दबाव या सर्व गोष्टींना कसे नियंत्रित करायचे याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
हे आहे शाळांमधील सुरक्षिततेचे महत्व
महाराष्ट्र शिक्षण विभागाने वरील दिलेले सर्व नियम हे खूप चांगले घेतलेले आहे. या नियमामुळे आता शाळांमधील सुरक्षितता जास्त प्रमाणामध्ये वाढेल. कोणता विद्यार्थी काय काय करतो कधी पळून जातो हे सर्व आता त्याच्या पालकांना सहज समजेल.